1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

दोन ज्ञानदेव व तीन नामदेव

ज्ञानदेव दोन होते आणि नामदेव तीन होते, असा प्रसिद्ध वाद सुमारें ३० वर्षांपूर्वीं नगरच्या परलोकवासी भारद्धाज ह्यांनीं ‘सुधारक’ पत्रांत उपस्थित केला होता. ह्याचा परिणाम डॉ. सर ह्यांच्यावरहि होऊन त्यांनींदेखील नामदेवाला सुमारें १०० वर्षें अलीकडे ओढिलें आहे. ह्या वादाचा मुख्य मुद्दा हा आहे कीं, नामदेवाच्या अभंगांची भाषा ज्ञानेश्वरीच्या भाषेसारखी जुनी नाहीं ! जणू काय अभंगांसारखा नित्यपाठांत असलेल्या गीतांची भाषा कायम राहणें शक्यच आहे! अलिकडे ३०।४० वर्षांत आम्हीं प्रार्थना समाजियनांनींच अशा अभंगांचें स्वरूप जुन्या लोकांच्या मतांची पर्वा न बाळगतां किती तरी बदलून टाकलें आहे. असें असतां हा भाषेच्या मुद्याचा बाऊ निदान आम्हांला तरी वाटूं नये. तुकारामाची अस्सल गाथा रा. भावे ह्यांनीं अलिकडे मूळ भाषेंत प्रसिद्ध केली आहे. तिच्यांत आज जो फरक झालेला आहे, तो पाहतां, नामदेवाच्या आजच्या गाथेहून मूळ गाथा फार भिन्न असावी, हें उघड आहे. सर भांडारकरांचा निर्वाणीचा मुद्दा असा आहे कीं, तुर्कांनीं मूर्ति फोडल्याचा उल्लेख नामदेवांनीं केला आहे, म्हणून तो १४ व्या शतकांतच असला पाहिजे. महमूद गिजनीनें सोमनाथाची प्रसिद्ध मूर्ती इ. स. १०१४ सालीं फोडून जें उदाहरण घालून दिलें, तें त्याच्या मागच्या मुसलमानांनीं सतत दोन शतकें गिरविलें. इ. स. १२७० पासून १३५० पर्यंत जगलेल्या आणि सा-या भरतखंडभर फिरवलेल्या नामदेवासारख्या बाणेदार आणि शूर क्षत्रिय भक्ताला मुसलमानांचा हा आततायीपणा कळल्याशिवाय राहणें शक्यच नाहीं. असो. भारत इतिहास मंडळाच्या गेल्या वार्षिक सभेंत आळंदीचे पंडीत पांडुरंग शर्मा यांनीं ह्या वादाला चांगलें सविस्तर उत्तर दिलेलें सदर मंडळाच्या अहवालांत आतां प्रसिद्ध झालें आहे. त्यांनीं नामदेव व ज्ञानदेव समकालीन असून त्यांचा काल इ. स. १३५० पूर्वींच होता, असें सिद्ध केलें आहे.

दारूची बंदी कीं शिक्षणाची सक्ति?

त्यांत विशेष दुःखाची गोष्ट कीं, दारूबंदी कीं शिक्षणाची सक्ति हा पेंच बहुजनसमाजाच्या गळ्याला पडला आहे. दिवसेंदिवस लोक कर देण्याला अधिक नाखुष होणार. कराचें नांव काढलें कीं, लोक बेताल होतात. हा धडा झांशी म्युनिसिपालिटीनें पाणीपुरवठ्याचा आवश्यक कर बसविण्याचा प्रयत्न करून सर्वांस शिकविला आहे. अशा साडेसातीच्या वेळीं शिक्षणाचें मंगळसूत्र सरकारनें दारूच्या बाटलीच्या गळ्यांत बांधलें आहे. शिक्षण नको म्हणाल्यास जनतेचेंच नुकसान आणि दारूची बंदी नको म्हटलें तरी तिचेंच नुकसान. लंका जळली तरी मारुती सुरक्षित या न्यायानें जनता आणि त्यांचे दिवाण यांच्यांत वरील मंगळसूत्राचा डाव टाकून पुन्हा आपण मोठी राजकीय सुधारणा केली असें सरकार सांगत सुटलें आहे. “पण्यांगनेव नृपनीतिरनेकरूपा”. वरवर पाहणारास सरकारचा त्यांत मुळींच दोष नाहीं असें दिसून येतें. कारण सरकार थोडेंच दुकान मांडून बसलें आहे ! दुकानें आमच्याच लोकांनीं उघडलेलीं व दारूहि बहुजनसमाजच अधिक पिणार. सरकारचे रिपोर्ट वाचावे तर त्यांत सालोसाल मद्यपाननिषेधाचें काम लोकांचे पुढारी मन लावून करीत नाहींत अशा उलट्या बोंबा आणि नक्राश्रु जागोजाग आढळून येतात. जणू काय व्यापार वाढविण्याचें काम सरकारचें आणि ‘पोकळ निषेध करण्याचें काम दुबळ्या जनतेच्या ऐदी पुढा-यांचें. पूर्वींच्या राज्यांत लोक दारू पीत होते. पण आतां जशी जो तो गांज्याची चिलीम आपणच भरतो; तशी पूर्वीं जो तो आपली दारू आपणच तयारहि करीत असे. परंतु आतां कलालास सरदारी मिळते. पूर्वीं कलालाची समग्र जात अस्पृश्य समजून बहिष्कृत वर्गांत गणली जात असे. हा फरक ध्यानांत ठेवण्यासारखा आहे.

दारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज

या लेखाच्या मथळ्यांत सांगितल्याप्रमाणें नियमित आणि निश्चित स्वरूपांतच आज येथें आपल्यास जबाबदारपूर्वक विचार करावयाचा आहे. दारूचें अथवा इतर व्यसनांचे उच्चाटन करणें इतक्या साधारण स्वरूपांत, असल्या साधारण सभेंत व्यावहारिक फायद्याचें होईल असें संभवत नाहीं. ह्या विषयाचा बहुजनसमाजाच्या हिताच्या दृष्टिनेंच विशेष विचार करावयाचा आहे. सुशिक्षित वर्ग, भांडवलवाले, अधिकारीवर्ग, मोठमोठे जमीनदार, ह्यांच्या हिताची काळजी घेण्यास ते स्वतः समर्थ आहेत. बहुजनसमाजाची – निदान हिंदुस्थानांतील जनतेची तशी गोष्ट नाहीं. सरकार स्वकीय असो, परकीय असो, तें जनतेचें पूर्णपणें प्रतिनिधि होईपर्यंत तिचे ट्रस्टी या स्वरूपांतच येथें राहणार; आणि त्या दृष्टीनेंच जनतेच्या पैशाचा व्यय करण्याचा त्याला अधिकार राहणार. कांहीं विद्धान लोक दारूसारख्या व्यसनाचे बाबतींत व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा घुसडतात. रा. लवाटेसारख्या व्यसनद्वेष्ट्यांनींसुद्धां हाच मुद्दा पुढें आणलेला आहे. आमचें सरकार जर पूर्णपणें प्रातिनिधीक असतें, तेव्हांहि जरी हा मुद्दा योग्य ठरला नसता, तरी शोभून गेला असता. आतां तो जनतेच्या दृष्टीनें विशेषतः निषिद्ध आहे. पुढारलेल्या वर्गांपैकी कोणीहि किंबहुना प्रत्यक्ष सरकारदेखील ही सबब पुढें आणणें हल्लींसारख्या कटकटीच्या काळीं, मद्यपानबंदीसारख्या दुर्घट सुधारणेच्या कामींहि प्रागतिकांनीं आपल्या उलट जाणूनबुजून गैरसमजाची धूळ उडवून घेण्यासारखें आहे. म्हणून हा मुद्दा अथवा सबब आजच्या विषयासंबंधीं कोणी पुढें आणणार नाहींत अशी माझी आशा आहे. दारू पिणा-या कांहीं अपवादात्मक व्यक्ति असल्या तरी सबंध समाजचे समाज ह्या व्यसनापायीं मागासलेल्या स्थितींत वर निर्दिष्ट केलेल्या पुढारलेल्या वर्गांत आढळून येत नाहीं. उलटपक्षीं बहुजनसमाजांत अशा कित्येक जाती आढळतील कीं, सक्ति केल्याशिवाय त्यांच्या उन्नतीची जवळजवळ आशाच खुंटलेली आहे. दारूचा व्यापार, हल्लीं चालू आहे तशा प्रकारचा, बंद केल्यामुळें कांहीं  भांडवलवाल्यांचा व्यक्तिशः तोटा होईल हें कबूल आहे. पण सरकार हें व्यक्तिसाठीं नसून सर्व जनतेसाठीं असतें.

तुबायाझा

तुबायाझा : ह्या नांवांतील मूळ शब्द वर सांगितल्याप्रमाणें अशुभराजा ह्यासंबंधी मीं एक दंतकथा ठिकठिकाणीं ऐकली ती अशी :- ‘एकदां एका ब्रह्मी राजाची एक गर्भवती राणी अत्यवस्थ आजारी पडली. ती मेलीच असें समजून तिला स्मशानांत पाठविलें. थडग्यांत उतरवितांना ती जिवंत आहे असें आढळलें. स्मशानांत नेलेली राणी राजानें पुन्हा स्वीकारणें शक्यच नव्हतें. तिला थडगें खणणा-या संडाला जातींतच ठेवून दिलें व तिचे पोटीं पुढें जो राजपुत्र झाला त्याला अशुभराजा हें नांव पडले. त्याला संडालांचें मुख्य पद मिळून, स्मशानांतील धार्मिक संस्कारांत बौद्ध फौंजीला (भिक्षूला) जी दक्षिणा मिळेल तितकीच ह्या राजवंशालाहि मिळावी असें राजशासन मिळालें’. ही दंतकथा मला पगाम येथील तुबायाझांच्या खेड्यांतील पाटलानें व सगाईन येथील एका सभ्य गृहस्थानेंहि स्वतंत्रपणें सांगितली. कथा खरी असो नसो, ब्रह्मी संडाला लोक राजवंशाशीं आपला संबंध कसा पोंचवितात हें ह्यावरून दिसतें. मलबारांतील पुलयन, चिलमन ह्यांचाहि अन्य रीतीनें राजवंशाशीं कसा संबंध येतो हें मीं हिंदुस्थानांत पाहिलें तें मला स्मरलें. तुबायाझा हे बहिष्कृत असले तरी कधीं जित नव्हते असें त्यांचें म्हणणें आहे. हे संडालाहून – संडाला लोक मणीपूरच्या बाजूनें हिंदु संस्कृतीच्या राजानें प्राचीन काळीं ब्रह्मदेशांत नेले असावेत. ह्याशिवाय माझा तर्क दुसरा धांवत नाहीं. अलिकडे दक्षिण हिंदुस्थानांतील लक्षावधी पारया, फुलया इत्यादी अस्पृश्य जतींचे लोक पोट भरण्यासाठीं ब्रह्मदेशांत अगदीं हीन धंदे करून राहिले आहेत ते मुळींच बहिष्कृत नाहींत. पण हे संडाला मात्र प्राचीन काळीं गेलेले अद्यापी तुरळक तुरळक आपल्या जुन्या वतनाच्या गांवीं थडगें खणण्याचें आपलें जुनें वतनच चालवीत आहेत; त्याअर्थीं हे प्राचीन हिंदी संस्कृतीचें वतन प्राचीन हिंदी राजांनींच स्थापिलें असेल असें माझें मत आहे. विशेष तपशिलासाठीं पुढें निरीक्षण नंबर १ व ३ हीं पाहा.

तुकाराम

भागवत धर्माचा कळस तुकाराम. ह्यांना तर प्रसिद्ध श्रीशिवरायाच्या राजाश्रयाचाहि विटाळ सहन झाला नाहीं ! रामदासांनीं तो आश्रय संपादन केला, म्हणूनच उलट त्याला संतमालिकेंत स्थान मिळणें अशक्य झालें!! राजेलोकांनीं दिलेल्या देणग्या बडवे घेतात, पण त्यांचा वारक-यांच्या धर्माशीं कांहींच संबंध नाहीं. वारक-यांची हल्लींची घटना विशेष करून तुकाराममहाराजांच्या चौदा शिष्यांनीं त्यांतल्या त्यांत महाराजांच्या निधनानंतर शिष्य झालेल्या निळोबांनीं केलेली दिसते. तुकाराम ह्यांना नामदेवांचा अवतार समजण्यांत येतें. नामदेवांचा शतकोटी अभंगांचा पण तुकारामांनीं पूर्ण केला. त्यामुळें त्यांच्यानंतरच ‘ज्ञानदेव पाया व तुकाराम कळस’ अशी म्हण प्रचारांत आली आहे. पण ज्ञानदेवाचें चरित्रलेखन, त्याचें धार्मिक शिक्षण व त्याची कार्यसिद्धि सर्वस्वी नामदेवावरच अवलंबून होती. त्याच्या बुद्धिवैभवाची साक्ष पुढें एकनाथांनीं उजळ राखिली नसती तर ज्ञानदेवाची आठवणहि पार विसरून महाराष्ट्र आज कृतघ्न ठरला असता. ज्ञानदेव, नामदेव, एका, तुका, हीं जीं चार नांवें महाराष्ट्राच्या हृत्पटावर अक्षय्य कोरलीं आहेत, त्यांत ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद मुळींच नाहीं. येणेंप्रमाणें नामदेवानें स्थापिलेला भक्तिमार्ग प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या व अप्रत्यक्षपणें पंजाबाच्या उद्धारला आणि ह्या दोन स्वराज्यसंपन्न राष्ट्रांच्या द्वारां अखिल भारताच्या उद्धाराला एके काळीं कारण झाला. त्या नामदेवाची पुण्यतिथि पाळणें महाराष्ट्राचें आद्य कर्तव्य आहे, ह्यांत शंका नाहीं.

  1. तामीळ भक्त
  2. तांत्रिक वाममार्ग
  3. तपशिलाचें वर्गीकरण
  4. तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र
  • 70
  • 71
  • 72
  • 73
  • 74
  • 75
  • 76
  • 77
  • 78
  • 79
Page 75 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी