मग महारामांगांचे काय हाल वर्णावेत !

माणसांना औषध घेण्याची संवय नव्हती; कारण तें कधीं मिळण्यासारखेंच नव्हतें; मग गुरांच्या दवाखान्याची गोष्ट कशाला ? ह्यापुढें शिक्षणाच्या, देवधर्माच्या आणि करमणुकीच्या साधनांचे विचार स्वतः माझ्याच डोक्यांत मेहनांत, मग तीं साधनें ह्या भिकार जिल्ह्यांत तेव्हां दिसलीं नाहींत हें निराळें कशाला सांगावयाला पाहिजे ? ह्याच वेळीं हिंदुस्थान सरकारचा दिल्लीची नवी राजधानी उठवून देण्याचा विचार चालला होता !  आज ह्यासाठीं १५ कोटी रु. खर्च पडले आहेत ! ह्या हिशोबाला काय म्हणावें ? संस्थानांतला प्रकार तर औरच !!